शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

आजारांची वर्दी...त्रासदायक सर्दी

वातावरणातील सततच्या बदलांनी, सततच्या प्रवासाने तसेच अचानक आहार-विहारात घडलेल्या बदलांमुळे आपल्या आरोग्यावर पहिला हल्ला सर्दी करते. सर्दीचा त्रास सुरू झाला की आपोआपच डोकेदुखी तसेच कित्येकदा
खोकल्याचा त्रासही डोकं वर काढतो. मुळात सर्दी ही अनेक आजारांची जननी समजली जाते. त्याचप्रमाणे तापासारख्या अनेक आजारांची वर्दी म्हणजे पूर्वसूचनाही सर्दीच देते. सर्दीचा हा मुख्यत्वेकरून हिवाळ्यात उद्भवनारा आजार समजला जातो. थंडीत सकाळचा प्रवास, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे या सवयी सर्दीला आमंत्रण ठरतात. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात आणि प्रदूषित वातावरणामुळे कोणत्याही ऋतूमध्ये सर्दीचा त्रास अनेकांची पाठ सोडत नाही.


आधी पातळ असलेली सर्दी उत्तरोत्तर घट्ट होत जाते. सर्दी पडशात बारीक ताप येण्याचीही शक्यता असते. नाक बंद होऊन लालसर होते, घसा खवखवतो तसेच घशात खाजल्यासारखे होते. सर्दी झाल्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास थकवा जाणवतो आणि जास्त दिवस सर्दी तशीच राहिली तर अशक्तपणा वाढत जातो. नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्यानं नाकातून कानाकडे पोहोचणाऱ्या कानाघ नलिकेचे तोंड बंद होण्याची शक्यता असते. कानाघ नलिकेचे तोंड ब्लॉक झाल्याने कानात विशिष्ट संवेदना होणेमुळात सर्दी-पडसे एका विशिष्ट जातीच्या विषाणूंमुळे होते. कधीकधी सर्दी संसर्गामुळेही होऊ शकते. सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतील त्वचेचा दाह होतो आणि कित्येकदा नाकाच्या आतील त्वचेला सूज येते. नाकातून पाणी वाहू लागते. सर्दी झाल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसात नाकातले पाणी पांढरे तसेच पातळ स्वरुपाचे असते.
किंवा कानात गच्चपणा जाणवतो तसेच कानाचे दडेही बसतात.

संसर्गातून झालेली सर्दी दोन-तीन दिवसांत आपोआप बरी होते मात्र अशा सर्दीत थंड पदार्थ वर्ज्य करत खाण्यापिण्याच्या सवयीत प्राथमिक बदल करणे गरजेचं असतं. सर्दी झाल्यावर प्राथमिक उपाययोजना म्हणून भरपूर कोमठ पाणी प्यावं. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्यात कोबी टाकून त्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्याचप्रमाणे रात्री झोपताना कापूर ठेचून गरम पाण्यात टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी. तसेच पूर्णपणे विश्रांती घ्यावी. थंड वातावरणापासून दूर राहावं. शक्यतो एसीत जाणं टाळावं. प्रवास करताना कान आणि शरीर झाकून घ्यावं. उबदार कपडे तसेच झोपताना उबदार रजई घ्यावी. घरातलं वातावरण उबदार ठेवावं. शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची बाधा होणार नाही.

घट्ट झालेली सर्दी नाकपुड्यात साचून राहिल्याने नाक चोंदते आणि श्वसनाला त्रास होतो. नंतर डोकेदुखी सुरू होते. त्याचप्रमाणे घट्ट झालेली सर्दी जास्त काळ राहिल्यास छातीत कफ साचतो आणि खोकला डोकं वर काढतो. खोकला जास्त काळ राहिल्यास फुफुसाचे आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे खोकल्यावर त्वरीत इपचार
करणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा खोकल्याचं मूळ टीबीसारख्या आजारातही असतं. त्यामुळे खोकला जास्त काळ टिकल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. धुम्रपान, तंबाखू, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ पूर्णत: वर्ज्य करावेत. दही, तुप तसेच थंड पदार्थ खाणं टाळावं. आहार गरम असेल याची काळजी घ्यावी. विविध प्रकारचे सूप सर्दी आणि खोकल्यावर गूणकारी ठरतात. सर्दी आणि खोकल्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपायही करता येतात. मात्र घरगुती उपाय करूनही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

1) नियमित द्राक्षांचं सेवन केल्यानंही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते.
2) नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवावं.
3) एक चमचा मधात चिमूटभर पांढऱ्या मिरीचं चूर्ण टाकून नीट घोटून आठवडाभर दिवसातून चार ते पाचवेळा घ्यावं.
4) काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावं.

5) सुंठ आणि काळी मिरी पावडर मधात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळू शकतो
6) हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या दोन ते तीन पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकल्यापासून सुटका मिळू शकते
7) हा अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे.
8) मध आणि आवळा पावडर यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
9) पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, एक चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा